बावळंट शब्दावर तिचा
नेहमीच जोर असायचा।
अन् हाच तिचा शब्द
मला प्रेम नगरी दाखवायचा।
आज ही अठवतंय मला
ते गोड तिचं लाजणं...!
मनाला आवर घालुन
नजरेच्या भाषेत बोलणं।
मी नाही जा...असं
सारखं रागात ओरडणं।
या तिच्या स्वभावामुळेच तर..
हा प्रेम कवी जन्माला आला।
प्रत्येक पुरस्काराची हकदार ती
अन् पुरस्कार तिला अर्पण केला।
कवी प्रेम।
१६/१०/०१८
९६०४०००९६९
http://prempawal4000.blogspot.in/
No comments:
Post a Comment